आषाढी वारी 2025: सरकारकडून प्रत्येक दिंडीला आर्थिक मदत
पंढरपूर | १४ जून २०२५
या वर्षीच्या आषाढी वारीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला ₹२०,००० इतके अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
वारकऱ्यांसाठी सरकारकडून अनुदान
मागील वर्षीप्रमाणे यंदाही १,१०९ दिंड्यांना आणि मानाच्या १० पालख्यांना अनुदान दिलं जाणार असून, एकूण ₹२ कोटी २१ लाख ८० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक दिंडीस ₹२०,००० ची मदत देण्यात येणार आहे.
वारी मार्गावर सोयी आणि सुरक्षेची तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पालखी मार्गावरील सुविधा, मुक्कामाचे ठिकाण आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणी यावर चर्चा झाली. दिवे घाट परिसरात विशेष बॅरिकेटिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एस.टी महामंडळाकडून ५२०० विशेष बस
वारी काळात भाविकांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५२०० विशेष बससेवा चालवली जाणार आहे. ही माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
सुसंगत वारीसाठी सरकार सज्ज
सामाजिक न्याय विभाग, स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय ठेवून वारी शांततेत पार पाडण्याचे नियोजन सुरू आहे. वारकऱ्यांसाठी वीज, पाणी, आरोग्य आणि निवासाच्या सुविधा तातडीने पूर्ण केल्या जाणार आहेत.
0 टिप्पण्या