![]() |
Ladki Bahin Yojana update |
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवलेला नाही – मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
राज्यातील गाजत असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात मोठे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत स्पष्ट केले आहे की, कोणत्याही विभागाचा निधी वळवलेला नाही, तर तो अर्थसंकल्पात ठरवलेल्या नियमानुसारच खर्च करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "अर्थसंकल्पाच्या नियमानुसार अनुसूचित जाती व जमातीसाठी असलेल्या वैयक्तिक लाभ योजनांची तरतूद त्यांच्या विशिष्ट ‘हेड’खालीच करावी लागते. त्यामुळेच अर्थमंत्री अजित पवार यांनी त्या योजनेची तरतूद महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत केली आहे."
विरोधकांचे आरोप आणि त्यावर उत्तर
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी रुपये व आदिवासी कल्याण विभागाचे ३३५ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही या मुद्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, "जर एखादा निधी एका कामासाठी राखून ठेवला असून तो दुसऱ्याच उद्देशासाठी वापरण्यात आला, तरच तो निधी वळवलेला मानला जातो. पण या प्रकरणात तसे काही झालेले नाही."
अर्थसंकल्पात नियमानुसार केलेली तरतूद
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, "लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेला खर्च हा नियमानुसार आहे. जो निधी वापरला गेला आहे, तो त्या विभागाच्या आणि त्याच उद्देशाच्या ‘हेड’खाली समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे निधी वळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या या खुलाशामुळे सरकारची बाजू अधिक ठामपणे समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या महिलांसाठीच्या महत्त्वाच्या योजनेवर विश्वास टिकवण्यासाठी हे स्पष्टीकरण आवश्यक होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
संबंधित बातम्या:
लाडकी बहीण योजनेची ११वी हप्त्याची माहिती
महिलांसाठी सरकारी योजनांचा आढावा
राज्यातील अर्थसंकल्प 2025 – महत्त्वाचे मुद्दे
0 टिप्पण्या